रविवार, 7 सितंबर 2008

मित्रा...तुझ्यासाठी



(ही कविता माझ्या एक मित्रासाठी ज्याने सध्या कविता लिहिणे सोडलंय त्याच्या कोमल भावनांचे फुलपाखरू सध्या पंख मिटून बसलंय.... पुन्हा एकदा तो नव्याने आभाळात झेप घेईल हीच आशा मनी बाळगून लिहिलेली ही कविता...)

---------------------------------------------------------------------------------------

भावनांच्या लाटा अदृश्य तरीही
कोसळतात त्यांच्यामुळे कधी
उभार मनाचे मनोरे....
बहरलेल्या एखाद्या बागेचे
गळून जातातही कधी
शब्दफुलांचे फुलोरे...

जरी गळून गेले फुलोरे तरी
अजुन सुगंध आहे बाकी...
भावनांच्या धुक्यातून वाट काढत बाहेर ये,
लक्ख प्रकाश घेऊन तुझी वाट पाहत
मित्रा तुझी जिंदगी आहे अजुन बाकी...

1 टिप्पणी:

chetanrocks ने कहा…

प्रिय , कविता प्रेमी रत्ना.........
वाचून खुप मनाला आधार वाटला , खरे सांगायचे तर मी ही खुश नाही कविता लिहाने सोडून , पण जीवनात कही गोष्टी आशा असतात त्याना कधी तरी भावनांच्या धुक्य मधे कोंडून ठेवावे लगते तरी तुम्ही माज्या साथी दाखवलेली ही कविता करावी अशी ओढ़ माला बावली आहे अणि याचा खर्च मी विचार करीन.. यासाठी मी तुमचा खुप आभारी आहे.