सोमवार, 2 जून 2008

काळजी

त्या दिवशी,
तुझ्या डोळ्यात उतरलेलं
जड उदासपण
जाणवत राहिलं आरपार
तुझ्या काळजीने सुकलेल्या चेह-यावर होता
मणामणाचा भार.....

भेटलो... उगीच निरर्थक गप्पा मारीत राहिलो
विषयांतर करत
एकमेकांना फसवत राहिलो...

दोघांनाही ठाऊक होतं
इथे खरी मौनाची गरज होती,
तुझ्या कोमेजलेल्या भावनांना
मोकळ्या श्वासाची समज होती...

जाताना... जड पावलं टाकत गेलास
मागे ठेऊन गेलास वेदनेचं विरळ धुकं
दाटून आलेले मेघ तरीही
तुझं आभाळ राहिलं मुकं मुकं

वाटतं... बरसून गेली असती एखादी सर
तर कदाचित तुझं आभाळ निरभ्र झालं असतंही...
कुणी घेऊन तुझा हात हाती
मायेने थोपटलं असतं पाठीवर तर
दिलाशाचं इंद्रधनू अवचित
मनावर उमटून गेलं असतंही...

2 टिप्‍पणियां:

ABHIJIT ने कहा…

दाटून आलेले मेध तरीही
तुझं आभाळ राहिलं मुकं मुकं

Ratna, chhaan kavita ahet tuzya.
Mi tuza blog baghitala ... now hope ki malahi mazya blog madhe sudharana karata yetil.

Unknown ने कहा…

chhan kavita aahe....mastach....
Keep this nice work going on....
Take Care....