रविवार, 13 जनवरी 2008

पालवी


प्रत्येकाच्या आयुष्यात Bad Patch अर्थात 'वाईट काळ' हा येतच असतो, तेव्हाही खचून न जाता चांगला काळ नक्की येईल असा सकारात्मक विचार घेऊन जगणाऱ्यांसाठी....

"पालवी"

आज पुन्हा शब्दांना पालवी फुटतेय
कुठला ऋतू हा ?

युगानुयुगे वठलेल्या ह्या देहाच्या वृक्षात
आतून पुन्हा
सळसळ जाणवतेय,
पुन्हा उन्हाचे कवडसे स्पर्शू लागलेत
अंधाऱ्या मनाच्या खोल गाभाऱ्याला,

अनंत काळापूर्वी निपचीत पडलेली

अबोल मनाची पाखरे,

पुन्हा प्रकाशाकडे झेपावू पाहतायत

ही काय जादू !


हा खरंच ऋतूबदल म्हणवा की
हे सारे मनाचेच खेळ...

वाटतं...

बहुधा संपत आली असावी माझी
शापीत निराशेची वेळ....

1 टिप्पणी:

रत्ना हिले ने कहा…

shriram – Romantic Kavita Comm.

very good poem from your side