
जगण्याच्या इच्छेतून पालवी फुटू लागली,
जणू चंद्रचांदणे उतरून माझ्या अंगणात आले,
अन् माझेही सूर तुझ्यासवे, नकळत गुणगुणले
हे असेही घडेल असं कधी वाटलं नव्हतं....
अंधाऱ्या वाटेवरची मी एक प्रवासी
अशीच चालणार होते,
ह्रदयातील एक जखम घेउन,
अश्वत्थाम्यासारखी माझं अस्तित्व संपेपर्यंत,

पण आता वाटतंय,
भाळावर जेथे जखम आहे,
तिथेच आसपास आहे तुझ्या स्वरांची लिपी,
त्यानेच आखलेल्या ह्या दोन रेषा,
एक रेषा त्याची,
एक रेषा तुझी.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें